“विराजसमोरील वळण — मृत्यूचा वळसा की पैशांचा?” जनतेचा जीव गेला तरी उद्योगपती आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार अबाधित!
प्रतिक मयेकर, पालघर बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या दाराशी असलेला बोईसर–चिल्हार हा रस्ता आज विकासाचे नाही, तर विनाशाचे प्रतीक ठरला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून चौपदरीकरण करण्यात आले, पण जनतेच्या सुरक्षेचे प्रश्न मात्र तिथेच पडून राहिले. वारंगडे येथील विराज कंपनीसमोरचे घातक वळण आजही बोईसरवासीयांच्या भीतीचा आणि रागाचा विषय आहे. या रस्त्यावरील वारंगडे येथील विराज कंपनीसमोरील…



